रेशन कार्ड आणि केवायसी रेशन कार्ड होणार रद्द ?
आपल्या देशात अजूनही काही लोकांना दोन वेळेच्या जेवणाचीही व्यवस्था करता येत नाही. अशा लोकांना मदत करण्यासाठी सरकारने रेशन कार्ड योजना सुरू केली आहे. या योजनेमुळे गरिबांना स्वस्त दरात किंवा मोफत धान्य मिळतं. कोरोना काळापासून पांढऱ्या रेशनकार्डधारकांना मोफत तांदूळ दिला जातो. या योजनेचा फायदा जवळपास 80 कोटी लोकांना होतो आहे.
परंतु काही लोक या योजनेचा गैरवापर करत आहेत. ज्यांना रेशन मिळण्याची पात्रता नाही, तेही बनावट रेशनकार्ड वापरून फायदा घेत आहेत. त्यामुळे सरकारने कठोर पावलं उचलण्याचा निर्णय घेतला आहे. पात्रता नसलेल्या लोकांची रेशनकार्डं रद्द केली जाणार आहेत.
बनावट रेशनकार्ड रद्द करण्यासाठी केवायसीची अट
सरकारने बनावट रेशनकार्ड ओळखण्यासाठी ई-केवायसी सुरू केलं आहे. शिधापत्रिकाधारकांनी आपली केवायसी प्रक्रिया पूर्ण करणं आवश्यक आहे. ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तुम्हाला 31 डिसेंबरपर्यंत वेळ दिला आहे, पण आता ही मुदत फेब्रुवारी 2025 पर्यंत वाढवण्यात आली आहे. जर केवायसी पूर्ण केली नाही, तर शिधापत्रिका रद्द होऊ शकते.
केवायसी कशी पूर्ण करायची?
- शिधापत्रिकाधारकांनी जवळच्या रेशन दुकानात जावं.
- POS मशीनवर फिंगरप्रिंटद्वारे पडताळणी करावी.
- कुटुंबातील सर्व सदस्यांनी आधार कार्ड आणि नोंदणीकृत मोबाईल क्रमांक द्यावा.
केवायसी स्थिती तपासा
तुमचं केवायसी पूर्ण झालं आहे की नाही, हे तपासण्यासाठी ‘मेरा राशन 2.0’ अॅप वापरा. या अॅपमध्ये आधार नंबर व कॅप्चा कोड टाका किंवा मोबाईलवर आलेल्या ओटीपीद्वारे स्थिती पाहा.
मोफत धान्य आणि बनावट कार्डांवर कारवाई
सरकारने गहू, हरभरा, साखर आणि इतर 10 वस्तू मोफत देण्याचा विचार केला आहे. मात्र, बनावट कार्डधारकांमुळे गरजू लोकांना त्याचा योग्य फायदा मिळत नाही. म्हणूनच, सरकारने बनावट कार्डं रद्द करून, खऱ्या लाभार्थ्यांना मदत मिळावी, यावर भर दिला आहे.
ही प्रक्रिया वेळेत पूर्ण केल्याने रेशनचा लाभ सुरक्षित राहील, आणि गरजू लोकांपर्यंत मदत पोहोचेल.